नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा बुधवार हा 40वा आणि अखेरचा दिवस असेल, असे भारताचे सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
राममंदीर आणि बाबरी मस्जीद यांतील जमीनीच्या वादावरील सुनावणीवेळी न्या. गोगोई म्हणाले, आज 39वा दिवस आहे. उद्या 40वा आणि अखेरचा दिवस असेल. अयोध्येतील 2.77 एकर जागेची समान वाटणी सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांच्यात करावी असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायलयाने 2010 मध्ये दिला होता. त्याविरोधात सर्वोच्च न्यायलयाच्या पाच न्यायाधिशांपुढे सुनावणी सुरू आहे.