सौरभ गांगुली यांनी केले स्पष्ट
नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघ आॅस्ट्रेलियातच एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेतील एक लढत दिवसरात्र पध्दतीने खेळविण्यात येणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले आहे.
या सामन्याव्दारे भारतीय संघ परदेशातील आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. आॅस्ट्रेलिया दौ-यावर प्रकाशझोतातील कसोटी कुठे खेळली जाईल, हे अद्याप निश्चित व्हायचे आहे. मात्र, अॅडलेड किंवा पर्थ हि ठिकाणे सध्या चर्चेत आहेत.
भारतीय संघाने गतवर्षी कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला होता. हा सामना जिंकत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली होती.