Maharashtra Politics : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून अमरावती जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दर्यापूर तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधाकर भारसाकळे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. (Maharashtra Politics) त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी शक्यता व्यक्त होत आहे. (Maharashtra Politics) सुधाकर भारसाकळे यांनी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि स्थानिक नेतृत्वाकडून विश्वासात न घेतल्याचा आरोप करत तालुकाध्यक्ष पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असून भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांचे भाऊ आहेत. (Maharashtra Politics) काँग्रेस नेत्यांवर नाराजी नगरपरिषदेच्या निवडणुकीपासूनच दर्यापूरमध्ये राजकीय वातावरण तापले होते. भारसाकळे यांनी बळवंत वानखेडे आणि जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यावर नाराजी व्यक्त केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीत जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची तिकिटे ऐनवेळी नाकारण्यात आली. काही नेत्यांनी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण करण्याचे काम केले, असा आरोप त्यांनी केला. तसेच, दर्यापूरमध्ये अल्पसंख्याक सेलच्या नियुक्त्या करताना आपल्याला कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचेही त्यांनी सांगितले. (Maharashtra Politics) काँग्रेसमधून बाहेर पडण्याची मालिका सुरूच याआधीही बाळासाहेब हिंगणीकर यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात काँग्रेससमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. (Maharashtra Politics)