पुणे – महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी समजली जाते. याच संत परंपरेतून संत वाडमयाच्या नव्या अंकुराने जन्म घेतला असून या संत परंपरेला नवे अंकुर फुटत असून नव्या पिढीला एक नवी प्रेरणा मिळत आहे. मात्र कोरोनामूळे गेल्या दोन वर्षापासून पंढरीची आस असूनही नाईलाजास्तव वारकरी आणि नव्या पिढीमध्ये मरगळ आली आहे. ही मरगळ झटकली जावी आणि संत परंपरेचे जतन व्हावे यासाठी गेनबा सोपानराव मोझे संस्थेच्या खराडी येथील सुंदर बाई मराठे विद्यालयात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/4138102269600516
स्थानिक भाविकांनीही हरिनामाच्या गजरात या पालखी सोहळ्याचा आनंद लुटला. विठूराया आम्हाला काही नको पण आंमची शाळा लवकर सुरु कर असे साकडे यावेळी विध्यार्थ्यानी विठ्ठलाला घातले.
हा पालखी सोहळा दैदीप्यमान व्हावा व विद्यार्थ्याच्या मनावर संताच्या शिकवणीचे व संत वचनांचे संस्कार व्हावेत या हेतूने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.रामभाऊ मोझे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. संत ज्ञानेश्वर, संत तूकाराम महाराज,संत मुक्ताबाई यांच्या वेशभूषेतील बालचमूनी आणि संत साहित्यातील ग्रंथांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.रामभाऊ मोझे, उपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर मोझे, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा प्रा. अलका पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.संजय सोमवंशी,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.स्मिता भोसले, शिक्षिका रंजना पवार, सविता ढेरगे, शुभांगी महापुरे, राजेश दरेकर, शशीकला रोहोकले,राजेश औटी आणि राजू सोमवंशी आदी याप्रसंगी उपस्थित होते.