मुंबई- आबालवृद्धांचा आवडता दहीहंडी उत्सव यंदाच्या वर्षी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या दहीहंडी समन्वय समितीने घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वावराबाबतचा
नियम पाळणे अशक्य असल्याने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात येत असल्याचे दहीहंडी समन्वय समितीकडून आज जाहीर करण्यात आले आहे.
दहीहंडी मंडळांची आर्थिक बाजू, आयोजक, सामाजिक अंतर या समीकरणाचा विचार करता गोपाळकाला हा उत्सव होणार नाही आणि तो साजरा केला जाऊ नये, असे दहीहंडी समन्वय समितीचे प्रामाणिक मत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गोविंदापटूला, प्रत्येक दहीहंडी पथकाला कळकळीची विनंतीही आहे, वरील निर्णय हा या वर्षीसाठी ठाम आहे. यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे दहीहंडी समन्वयसमितीने स्पष्ट केले.
———————————————-