बीड : करोनाची दुसरी लाट देशात धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे करोना संसर्गाची भीती सर्वांच्या मनात बसली आहे. देशातील कोरोनाचा भयानक कहर काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून ४ लाखांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद होताना दिसून येत आहे.
माणुसकी जिंकली
नाळवंडीतील (जि.बीड) गुजर कुटुंबिय कोविड इलाजासाठी दवाखान्यात. घरी आजी एकट्या. २ दिवसांपासून अन्नपाण्याविना गोठ्यात पडून. त्यांच्याजवळही कोणी जाईना. ही माहिती मिळताच विजयसिंह बांगर यांनी धाव घेत आजींना रुग्णालयात नेले. आजी निगेटिव्ह असून आता बऱ्या आहेत.@MarathiRT pic.twitter.com/fIkGX7FMja— नवी उमेद (@NaviUmed) May 15, 2021
तर दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या संख्येमुळे अनेक राज्यात ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. सरकार देखील या स्थितीसमोर हतबल झाल्याचं चित्र आहे. मात्र अशा कठीण काळातही माणुसकी जपली जात आहे.
अशातच बीड जिल्ह्यातील नाळवंडीमध्ये माणुसकीचे जिवंत उदाहरण असल्याची घटना समोर येत आहे. सोशल व्हायरल व्हिडियोनुसार, घरातील सर्वजण कोरोना बाधित असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. आजी घरात एकट्याचं असल्यानं त्यांना स्वतःसाठी जेवणही बनवता आलं नाही. त्यामुळे त्यांना तब्बल दोन दिवस अन्नपाण्याविना कुढत जगावं लागलं आहे. करोनाच्या संसर्गामुळे गेल्या दोन दिवसांपासून या आजीला मदत करण्यास कुणीही पुढे सरसावलं नाही.
गावातील रहिवासी विजयसिंह बांगर यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आजींना रुग्णालयात दाखल केलं आहे. यानंतर आजीची कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता त्यांची प्रकृती बरी आहे. दरम्यान सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून या पोलीस महिलावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचा कामगिरी बद्दल नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.