गोकुळ नारायण ः विधी महाविद्यालयात “सायबर लॉ’ या विषयावर व्याख्यान
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – ज्या वेगाने तंत्रज्ञानामध्ये बदल घडून येत आहेत. त्या वेगामध्ये सायबर कायदे बदलले जात नाहीत. त्यामुळे वकील व पोलीस यांनाही अशा गुन्ह्यांची उकल करताना अडचणी निर्माण होत आहेत. नवीन कायदा बनविण्याची प्रक्रियाही तंत्रज्ञानामध्ये होणाऱ्या बदलाच्या तुलनेत अतिशय संथ आहे, असे प्रतिपादन एशियन स्कूल ऑफ सायबर लॉचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोकुळ नारायण यांनी राजगुरूनगर येथे बोलताना केले.
हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे, सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालय, एशियन स्कूल ऑफ सायबर लॉ यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर कायद्याचे महत्त्व व वैशिष्ट्ये या विषयावर एशियन स्कूल ऑफ सायबर लॉचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोकुळ नारायण यांचे व्याख्यान झाले.
यावेळी हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य किरण शिंदे, रत्नाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, उपप्राचार्य प्रा. किशोर भागवत राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. राजाराम गरूड, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. शिवाजी बिबे, प्रा. किरण काळे, प्रा. प्रीती पवार, प्रा. अश्विनी शिंगोटे, प्रतिभा घेवडे, विनय बोरूडे, मंदा पानमंद, किरण निंबाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
गोकुळ नारायण म्हणाले, सध्याच्या काळामध्ये सायबर कायद्यांविषयी लोकांना ज्ञान असणे अतिशय महत्त्वाचे बनले आहे. ज्यामुळे आपण कुठल्याही गुन्हेगाराचे शिकार होण्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो. क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड यांद्वारे होणाऱ्या ऑनलाइन व्यवहारांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. माहिती तंत्रज्ञानाची माहिती प्रत्येक तसेच यासाठी सायबर कायद्यांविषयीचा स्वतंत्र अभ्यासक्रम विधी महाविद्यालयात सुरू करणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. राणी चव्हाण यांनी केले.