– ज्ञानेश्वर फड
आळंदी – सोशल मीडियाचा वापर जसजसा वाढत चालला आहे तशी सायबर गुन्हेगारी देखील वाढत आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकांची फसवणूक होत असते. ओटीपी, बँक डिटेल्स, लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून वयक्तिक महत्त्वाची माहिती मागवून फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यातच आता फेसबुक अकाउंट हॅक करून मित्रांना फोन पे, गुगल पे वर पैशांची मागणी करत फसवणूक करण्याचा नवीन प्रकार समोर आला आहे.
अशी केली जाते फसवणूक –
हॅकरकडून एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात येते. त्यानंतर त्यांच्या फ्रेंड लिस्टमधील काही व्यक्तींना, अपघात झाला आहे लवकर पैसे पाठवा किंवा इतर काही कारण सांगून पैशाची मागणी केली जाते. अडचणीत असलेल्या मित्राला मदत करण्यासाठी लोक पैसे पाठवतात आणि फसवणूक होते.
असाच एक फसवणुकीचा प्रकार आळंदीतील युवक सोमनाथ वाहिले आणि त्यांच्या मित्रांसोबत घडला आहे.
हॅकर आणि मित्र यांच्यातील संवाद –
हॅकर : थोडे पैसे पाठवू शकता का? उद्या परत करतो.
मित्र : ओके किती ?
हॅकर : 10000
मित्र : देतो या ऑफिसला
हॅकर : गुगल पे करा, मी बाहेर आहे.
मित्र : ओके पाठवतो. नं पाठवा.
हॅकर : नं पाठवला, प्रवीण.
मित्र : कोण हा प्रवीण ? तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे. त्यावर पाठवतो… (मित्राच्या लक्षात येते आपली फसवणूक होत आहे.)
फसवणुकीपासून बचावासाठी पोलिसांचे आवाहन-
“प्रतिष्ठित व्यक्तींचे फेसबुक अकाउंट हॅक करून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना फेसबुकवरुन पैशाची मागणी झाल्यास त्याला कोणीही प्रतिसाद देऊ नये. संबंधित व्यक्तीला फोन करून विचारूनच पैशाचा व्यवहार करावा. ज्यांचे अकाउंट हॅक झाले आहे त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.” – ज्ञानेश्वर साबळे (वरीष्ठ पोलीस निरीक्षक, आळंदी देवाची)
तुमच्यासोबतही असे काही घडल्यास तक्रार दाखल करा –