पुणे : पुणे शहरात रात्री नऊ वाजल्यापासून पहाटे पाच वाजण्यापर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली. पंतप्रधानांनी जाहीर केलेला पब्लिीक कर्फ्यूची मुदत रात्री नऊ वाजता संपत आहे. त्यानंतर पोलिस सहाआयुक्तांनी हा निर्णय जाहीर केला.
पुण्यापाठोपाठ ठाणे, पालघर आणि नाशिक येथेही संचारबंदी जरी करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
देशाच्या पंतप्रधानांनी पब्लिक कर्फ्यू जाहीर केल्यानंतर त्याला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद झाला. अक्षरश: संचारबंदी असल्या प्रमाणे चित्र होते. मात्र आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अभिवादन करण्यासाठी थाळीनाद करण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्यने रस्त्यावर आले. त्यामुळे रात्रीनंतर पुणेकर मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊ शकतील, अशी शक्यता लक्षात घेऊन हे आदेश देण्यात आले.
या काळात कोणीही रस्त्यावर येऊ शकणार नाही, असे आदेश देण्यात आले. त्यात आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन माध्यमे आणि अत्यावश्यक सेवा यांना वगळण्यात आले आहे. पुणेकरांनी या संचारबंदीला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.