नवी दिल्ली – केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालणार असल्याचे वृत्त कालपासून जाहीर होत आहे. त्यामुळे बहुतांश क्रिप्टोकरन्सीच्या दरामध्ये 15 टक्केपर्यंत घट झाल्याचे दिसून आले.
बिटकॉइनचा दर 18.53 टक्क्यांनी, इथेरमचा दर 15. 58 टक्क्यांनी तर तेथरचा दर 18.29 टक्क्यांनी कमी झाला.
असे बोलले जाते की भारतामध्ये दीड ते दोन कोटी लोकांनी क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक केली आहे. गुंतवणूकीची रक्कम 70,000 कोटीपेक्षा जास्त असल्याचे बोलले जाते. फक्त अल सॅलवेडार या देशात क्रिप्टोकरन्सी मान्यता देण्यात आलेली आहे.