पुणे : शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच शहरासह राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र नागरिकांनी या संचारबंदीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. आज सकाळी गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये भाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पहायला मिळाले.
गुलटेकडी येथिल मार्केट यार्डमध्ये नागरीकांची मोठ्या प्रमानात खरेदी साठी गर्दी केली होती. दरम्यान, नागरिकांची वाढती गर्दी पाहून पोलिसांनी आणि कृषीउत्पन बाजार समितीच्या कार्यकर्त्यांनी नागरीकांना जबरस्तीने बाहेर काढण्यात आले. दरम्यान, सकाळी साडे आठ नंतर नागरिकांना आता जाण्यास मनाई करण्यात आली.