मुंबई – खरीप हंगामातील पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मोबाइलवर पैसे जमा झाल्याचा एसएमएस आला आहे.
पीक निहाय आणि पिकाच्या स्थितीनुसार हे पैसे जमा झाले आहेत. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी आगोदर विमा रक्कम अदा केली होती त्यांच्या बॅंक खात्यावर पहिल्यांदा रक्कम जमा होत आहे. खरीप हंगामात अधिकत्तर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा अधिक भरला होता. आता रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. पण अनेक शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचा एसएमएस न आल्याने संभ्रमतेचेही वातावरण आहे.
पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळेच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास दिरंगाई झाली आहे. दिवाळीमध्ये ही रक्कम जमा करण्याचे आदेश राज्य सरकारने विमा कंपन्यांना दिले होते. मात्र, दीड महिन्यापासून हे पैसे प्रक्रियेतच अडकले होते. आता कुठे पैसे जमा होण्यास सुरवात झाली आहे.
हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार असले तरी कुण्या शेतकऱ्यास अडचण असल्यास त्या शेतकऱ्यांनी बॅंकेत किंवा विमा कंपनीकडे नाही तर आपली तक्रार ही तहसीलदार यांच्याकडे दाखल करावी लागणार आहे. त्यानंतरच तक्रारीचे निरसन होणार आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी आगोदर विमा रक्कम भरली होती त्यांना अगोदर लाभ मिळत आहे.