मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. हिंगणघाटची घटना ही अतिशय गंभीर आहे. महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सरकारने संवेदनशीलतेने यावर चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली.
राज्यातील सिंचन योजना, पाणीपुरवठा योजना बंद करण्यात आल्या आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपये मदत देऊ, सरकारने बांधावर जाऊन सांगितले होते; मात्र मदत न देता सरकारने केवळ शेतकऱ्याची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केला.