थेऊर(प्रतिनिधी) : चार वर्षांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणांवरून चिडून जावून ७ जणांनी एकावर धारदार कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना थेऊर ( ता हवेली ) येथे घडली आहे.
याप्रकरणी नितीन दत्तात्रय कुंजीर ( वय ३७, रा.थेऊर, ता. हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वर्कस रोहीदास चव्हाण, सुरेश रोहीदास चव्हाण, अनिल अर्जुन चव्हाण, राजेश प्रकाश चव्हाण, निलेश सुभाष शितोळे, अक्षय साहेबराव चव्हाण व ऋषिकेश वर्कस चव्हाण ( सर्व रा.थेऊर) यांचेविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज ( १७ मे ) रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारांस नितीन कुंजीर हे एका विवाह समारंभासाठी थेऊर येथील चव्हाणवस्ती येथे गेले होते.लग्नासाठी सर्वजण थांबलेले असताना दुपारी १२ – १५ वाजण्याच्या सुमारास तेथे वर्कस चव्हाण, सुरेश चव्हाण, अनिल चव्हाण, राजेश चव्हाण, अक्षय चव्हाण व ऋषिकेश चव्हाण हे आले. तेव्हा त्यांचेकडे कोयते होते.
त्यांनी चार वर्षांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरुन त्यांच्या वस्तीत आलेचे कारणावरुन सुरेश चव्हाण व राजेश चव्हाण व इतरांनी कुंजीर याना पकडुन ठेवले. तेव्हा वर्कस चव्हाण याने त्याच्या हातातील कोयत्याने तुला आता सोडणार नाही तुला खलासच करतो, असे म्हणुन डोक्यात वार केला. तेव्हा कुंजीर यांनी तो उजव्या हाताने झेलल्याने कोयत्याचा वार हातावर बसुन मोठी जखम झाली. तेव्हा अनिल चव्हाण याने “याला मारुनच टाकतो” असे म्हणुन हातातील कोयत्याने डोक्यावर वार केला.
तेव्हा कुंजीर यांनी डावा हात मध्ये घातल्याने तो वार हा डाव्या हाताचे अंगठ्यावर बसल्याने ते खाली पडले. वार झालेने दोन्ही हातातुन मोठ्या प्रमाणात रक्त येवु लागले तेव्हा सर्वांनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली. लग्नातील जमलेले लोक आल्याने ते सर्वजण तेथून निघुन गेले. नंतर कुंजीर यांना त्यांचे मित्रांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे.