पुणे(प्रतिनिधी) – वाघाच्या कातड्याची तस्करी प्रकरणात शिरूर पोलिसांनी अटक केलेल्या नऊ जणांना न्यायालयाने जामीन मंजुर केला. पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करणे, दोषारोपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत शिरूर पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याच्या अटीवर न्यायालायने हा आदेश दिला. शिरूर न्यायालयाने याबाबतचा आदेश दिला आहे.
पाबळ फाटा येथे कारवाई करत पोलिसांनी एक कोटी रुपयांची वाघाची कातडी आणि दहा लाख रुपयांच्या दोन चारचाकी असा ऐवज जप्त केला होता. सुरूवातील सर्वांना पोलीस कोठडी, त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर सर्वांनी ॲड. तोसिफ शेख, ॲड. किरण रासकर, ऍड. महेश रासकर, ॲड. स्वप्निल गिरमे, ॲड. क्रांती सहाणे, ॲड. सुरज जाधव, ॲड. दीपक गायकवाड, मोहम्मद शेख यांनी काम पाहिले.
किरण रासकर यांनी चार जणांचा जामिनासाठी अर्ज केला होता. मयूर मारुती कोळेकर ( वय 22 रा.किवळे ता.खेड जि पूणे ), विनायक सोपान केदारी ( वय 30 वर्षे रा.मंचर ता.आंबेगाव जि.पूणे ), साईराज विजय गाडे ( वय 20 वर्षे रा.खरपूडी राजगूरुनगर ता.खेड जि.पूणे ), चिराग कैलास हांडे ( वय 26 वर्षे रा.मंचर ता.आंबेगाव जि.पूणे ), कौस्तुभ महादू नायकडे ( वय -28 वर्षे रा.मंचर ता.आंबेगाव जि.पूणे ), वैभव अर्जून गाडे ( वय 20- रा. राखरपूडी राजगूरुनगर ता.खेड जि.पूणे ), शिवाजी किसन कूसळकर वय -30 वर्षे रा.कडा ता.आष्टी जि.बीड ), अमोल बाळू राजगूरु ( वय -34 रा. वडगाव काशिंबेग ता.आंबेगाव जि.पूणे ), धनंजय जयराम पाटोळे वय -22 रा.वडगाव पाटोळे ता.खेड जि.पूणे ) अशी नऊ जणांची नावे आहेत.