सातारा (प्रतिनिधी) -जिल्हा बंदीचा आदेश लागू असताना त्याचे उल्लंघन करत पुणे व मुंबईतून विनापरवाना प्रवास करून आलेल्या आरफळ व मालगाव (ता. सातारा) येथील 11 जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी, सचिन प्रकाश ढाणे (रा. पुणे), शामराव जनार्दन दळवी, मंजुळा शामराव दळवी, सचिन शामराव दळवी, अंकिता सचिन दळवी (रा. धारावी, मुंबई), संपत पांडुरंग कुंभार, रेखा संपत कुंभार (रा. डोंबिवली), फिरोज हमीद शेख, सलमा फिरोज शेख, समीर युसूफ शेख (रा. मुंबई) हे 8 ते 17 जून या कालावधीत मालगाव व आरफळ येथे आले होते.
सरपंच विलास कदम, पोलीस पाटील रमेश मोझर, ग्रामविकास अधिकारी ए. आर. कुंभार यांनी ते आलेल्या ठिकाणी जाऊन खात्री केली. त्यात ते विनापरवाना आल्याचे स्पष्ट झाले. याबाबत हवालदार महेश कदम यांनी फिर्याद दिली आहे. सहाय्यक फौजदार मोरे तपास करत आहेत.