ओंन्गल : क्रिकेटच्या सामन्यात अनेकदा व्यत्यय आलेला आपण सर्वांनी पाहिला आहे. काही महिन्यापूर्वी रणजी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत तर चक्क मैदानात साप शिरल्यामुळे सामना खांबवावा लागला होता.
सध्या २०१९-२० रणजी हंगामाचे बाद फेरीचे सामने सुरू आहेत. ओंगल येथे सौराष्ट्र विरूध्द आंध्र प्रदेश हा सामना सुरू आहे. या सामन्यात खेळ सुरू असताना मैदानात गाय शिरल्यामुळे काही काळासाठी सामना थांबवावा लागला.
तिस-या दिवसाच्या खेळादरम्यान, सामना सुरू असलेल्या सीएसआर शर्मा कॉलेजच्या मैदानावर चक्क गाय शिरली. गाय थेट खेळपट्टीपर्यत धावत गेल्यामुळे तिला थांबवण्यासाठी मैदान कर्मचा-यांची चांगलीच धावफळ झालेली पहायला मिळाली. या सर्व प्रकारामुळे सामना काही काळासाठी थांबवावा लागला.