नवी दिल्ली : ‘झुंडबळीच्या गुन्ह्यात सहभागी असलेले लोक हिंदू नाहीत; ते हिंदुत्वविरोधी आहेत. हिंदू-मुस्लीम वेगळे नाहीत, ते एक आहेत. सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ एकच आहे,’ असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हटले होते. दरम्यान, भागवत यांच्या केलेल्या विधानाला एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
भेकडपणा, हिंसा आणि हत्या करणं, हे गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचाच अविभाज्य भाग आहे. मुस्लिमांचे झुंडबळीही याच विचाराचे परिणाम आहेत,” अशी टीका ओवेसी यांनी सरसंघचालकांवर केली. “मोहन भागवत यांनी मांडलेल्या भूमिकेवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली. ओवेसी यांनी ट्विट करत सरसंघचालकांवर निशाणा साधला.
RSS के भागवत ने कहा “लिंचिंग करने वाले हिंदुत्व विरोधी”।इन अपराधियों को गाय और भैंस में फ़र्क़ नहीं पता होगा लेकिन क़त्ल करने के लिए जुनैद, अखलाक़, पहलू, रकबर, अलीमुद्दीन के नाम ही काफी थे।ये नफ़रत हिंदुत्व की देन है, इन मुजरिमों को हिंदुत्ववादी सरकार की पुश्त पनाही हासिल है। 1/3
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) July 5, 2021
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भागवत यांनी सांगितलं की, ‘झुंडबळी घेणारे हिंदुत्वविरोधी आहेत.’ या गुन्हेगारांना गाय आणि म्हैस यांच्यातील फरक कळत असेल, पण हत्या करण्यासाठी जुनैद, अखलाक, पहलू, रकबर, अलिमुद्दीन यांची नावं पुरेशी होती. हा द्वेष हिंदुत्ववादाची देण आहे. या गुन्हेगारांना हिदुत्ववादी सरकारचं पाठबळ आहे,” असा आरोप ओवेसी यांनी केला.
केंद्रीय मंत्री के हाथों अलीमुद्दीन के कातिलों की गुलपोशी हो जाती है, अखलाक़ के हत्यारे की लाश पर तिरंगा लगाया जाता है, आसिफ़ को मारने वालों के समर्थन में महापंचायत बुलाई जाती है, जहाँ भाजपा का प्रवक्ता पूछता है कि “क्या हम मर्डर भी नहीं कर सकते?” 2/3
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) July 5, 2021
“केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते अलीमुद्दीनच्या गुन्हेगारांना हार घातले जातात. अखलाकची हत्या करणाऱ्याच्या मृतदेहावर तिरंगा पांघरला जातो. आसिफला मारणाऱ्यांच्या समर्थनार्थ महापंचायत बोलावली जाते.
कायरता, हिंसा और क़त्ल करना गोडसे की हिंदुत्व वाली सोंच का अटूट हिस्सा है।मुसलमानो की लिंचिंग भी इसी सोच का नतीजा है। 3/3
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) July 5, 2021
जिथे भाजपाचाच प्रवक्ता म्हणतो की,’आम्ही हत्या पण करू शकत नाही का?’ भित्रेपणा, हिंसा आणि हत्या करणं, हे गोडसेच्या हिंदुत्वावादी विचारांचाच हा अविभाज्य भाग आहे. मु्स्लिमांचे झुंडबळी याचं विचारांचे परिणाम आहेत,” अशी टीका ओवेसी यांनी सरसंघचालकांना प्रत्युत्तर देताना केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील मुस्लीम राष्ट्रीय मंचने ‘हिंदुस्थान फर्स्ट, हिंदुस्थानी बेस्ट’ या कार्यक्रमाचं आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिमांना भयाच्या चक्रातून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते . यावेळी झुंडबळींवरही त्यांनी भाष्य केलं होतं.