हैदराबाद – करोनाविषाणूच्या फैलावामुळे पसरत असलेल्या कोविड-19च्या साथीवर प्रतिबंध करण्यासाठी भारतातला संशोधन संस्थांनी लसी शोधल्या असून या लसींची आपातकालीन वापरासाठी परवानगी मागण्यात आली होती. त्यामुळे देशभर आशादायक वातावरण निर्माण झाले होते. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबादच्या भारत बायोटेकने यासंदर्भात हैदराबादच्या राष्ट्रीय औषध प्रमाणीकरण व संशोधन संस्थेकडे (CDSCO) प्रस्ताव पाठवले होते. पण हे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाहीत. लसीची सुरक्षितता आणि प्रभावीपणाबद्दल पुरेशी माहिती दिलेली नसल्यामुळे हे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.
लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकतेबाबत “सिरम’ आणि “भारत बायोटेक’ या संशोधन संस्थांनी पुरेसा डाटा दिलेला नाही. त्यांना अजून डाटा सादर करायला सांगितला आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांचे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाहीत, असे सूत्रांनी माध्यमांना सांगितले आहे.
CDSCO च्या समितीने फायझर, सीरम आणि भारत बायोटेकच्या अर्जाचा आढावा घेतला. अनेक बैठका ही एक ठरलेली स्टॅंडर्ड प्रॅक्टीस आहे. एक ते दोन आठवडे ही प्रक्रिया चालेल असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील सूत्राने सांगितले.
करोना व्हायरसवर मात करण्यासाठी लस अखेर दृष्टीपथात आली आहे. आतापर्यंत जगभरात सहाकोटी पेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. पंधरा लाखापेक्षा जास्त नागरिकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्यातरी लस हाच या आजाराला रोखण्याच एकमेव मार्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील काल एका कार्यक्रमात बोलताना देशवासियांना आता लसीची जास्त काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.