नवी दिल्ली – देशात पुन्हा एकदा करोनाने जोर पकडला असून यादरम्यान मृतांचा आकडाही वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत करोनाचे 9 हजार 119 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच 24 तासात देशभरात 396 लोकांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे.
#COVID19 | India reports 9,119 new cases, 10,264 recoveries & 396 deaths in the last 24 hours, as per Health Ministry.
Active cases stand at 1,09,940 – lowest in 539 days pic.twitter.com/x4SLz63Q5c
— ANI (@ANI) November 25, 2021
याशिवाय 10 हजार 264 जण करोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात आता एकूण 1,09,940 सक्रिय रुग्ण आहेत, जे 539 दिवसांनंतरचे सर्वात कमी आहे.
दरम्यान, जगभरात करोनाने पुन्हा एकदा तोंड वर काढले असून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राज्यांना पत्र लिहून सतर्क राहण्याचे सांगितले आहे.