उस्मानाबाद – राज्यावर करोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट आहे. संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर या नियमांचे पालन करण्याचे शासनाकडून सांगण्यात येते. अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू आहेत. मात्र, अनेकदा मंत्रीच या नियमांना पायदळी तुडवत असल्याचे दिसते. राज्याचे भूकंप व पुर्नवसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या कार्यक्रमामध्ये कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेले आहेत.
शनिवारी उस्मानाबाद जिल्ह्यात जनता कर्फ्यु असताना. कळंब नगर शहरामध्ये मंत्री बनसोडे यांच्या उपस्थितीत जंगी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला हजारो लोकांची उपस्थिती होती. अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हता. सोशल डिस्टनसिंगचाही फज्जा उडविण्यात आला.
विशेष म्हणजे राज्यमंत्री बनसोडे यांनीही कार्यक्रम संपेपर्यंत मास्कच घातला नाही. हा कार्यक्रम कळंब नगरपालिकेने शासकीय सुविधांसह आयोजित केला होता. मात्र याची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. या कार्यक्रमास कळंबचे नायब तहसीलदार अस्लम जमादार आणि पोलीस अधिकारी तसेच कर्मचारीही उपस्थित होते. उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कळंब नगर पालिकेला नोटीस बजावली आहे.