चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील केळझर येथील जंगलात एका जोडप्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणांनंतर कुटुंबीयांकडून विवाहास विरोध असल्यामुळे या दोघांनी आपल्या जीवनाचा शेवट केला आहे. या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे.
राजू आत्राम आणि सलोनी मडावी असे मृतांची नावे आहे. आत्महत्येनंतर या दोघांचे जंगलात झाडाला गळफास लावलेले मृतदेह 10 दिवसांनंतर उजेडात आले.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पथक पोहोचले. घटनास्थळी पुरूष आणि महिलेेचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत जमीनीवर पडून असल्याचे दिसल्याने त्यांनी पंचनामा करून कुजलेले दोन्ही प्रेत उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रूग्णालय मूल येथे रवाना केले.
राजु व सलोनीचे प्रेमसंबंध होते. त्यांना विवाह सुद्धा करायचा होता. मात्र यांच्या नात्यास व लग्नास कुटुंबीयांचा विरोध होता. कुटुंबीयांच्या विरोधामुळे राजु आणि सलोनी यांचा विवाह होऊ शकला नाही. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.