सातारा – कणूर (ता. वाई) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील तानाजी लक्ष्मण राजपूरे (वय 40) व पूजा तानाजी राजपुरे (वय 36) या दाम्पत्याने दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. मुल होत नाही या नैराश्यातून त्यांनी घरातील पत्र्याखालील लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेतला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
पोलिस पाटील सूरज जठार यांनी याबाबतची माहिती दिली. या घटनेची नोंद वाई पोलिसात झाली असून हवालदार एस. एस. मुजावर व के. ए. आवळे- वैराट तपास करीत आहेत. तानाजी राजपुरे काही वर्षे मुंबईत माथाडी कामगार म्हणून काम केल्यानंतर गावी येऊन शेती करीत होते. त्यांच्यामागे आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. वाई पोलीस तपास करत आहेत.