नवी दिल्ली – केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन कायदा व नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) असे कायदे संसदेत बहुमताच्या जोरावर पारित केले आहेत. देशाच्या ऐक्यास व अखंडतेस या कायद्यामुळे तडा जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे केंद्र सरकारने हे कायदे तात्काळ रद्द करावेत, अशी मागणी देशभरात होता आहे. तसेच या मागणीसाठी सर्वपक्षीयकडून महामोर्चा काढण्यात आली आहे. तर याच मुद्दाबाबत देशभरात सुधारीत नागरीकत्व कायद्याला (का) विरोध मोर्चात हिंसक वळण घेतले आहे. याच हिंसक प्रदर्शनांवर योगगुरू रामदेव बाबा यांनी असंतोष व्यक्त केला आहे.
रामदेव बाबा म्हणाले,’जे लोक देशाच्या स्वातंत्र्याचे नारे लावत आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. हा देश सर्वांचा आहे. देशातील रोजगार आणि महागाईवर सध्या काम करण्याची गरज आहे. विरोधी पक्षांना देशहिताचे भान असायला हवे, तसेच देशातील जनसंख्या नियंत्रणाबाबत सर्वानी गांभीयाने विचार करायला हवा, वाढती जनसंख्या बॉम्बपेक्षाही स्फोटक आहे.’ असं ते म्हणाले.