मुंबई – मेलबर्न कसोटीत विजय मिळवल्यानंतर देखील भारतीय संघाकडून सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी अनेक चुका झाल्या असून त्या नेटमध्ये सराव करताना दूर करा, असा सल्ला भारताचा माजी कसोटीपटू व गोलंदाज जहीर खान याने दिला आहे. या चुका वेळेवर दुरुस्त केल्या नाहीत तर त्याचा भारतीय संघाला फटका बसू शकतो, असा इशाराही त्याने दिला आहे.
प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा फॉर्ममध्ये नाही. त्याची अपयशी कामगिरी संघासाठी चिंतेचा विषय बनली आहे. त्यानेही आपल्या तंत्राची पुन्हा एकदा उजळणी केली पाहिजे. त्याने धावा केल्या तर भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारू शकेल. त्याची बॅट चालली तर भारतीय संघाची चिंता मिटेल. त्याच्यासह संघातील हिटमॅन रोहित शर्मासह कर्णधार रहाणेसह सर्व फलंदाजांनी जबाबदारीने खेळ केला पाहिजे, असेही जहीर म्हणाला.
या सामन्यात भारतीय संघाकडून फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यातही अनेक चुका झाल्या. संघ जिंकला त्यामुळे त्यावर कोणी बोलणार नाही, पण तरीही आपल्या कामगिरीबद्दल आत्मपरीक्षण केले पाहिजे, असेही त्याने सांगितले.