नवी दिल्ली -मागील 24 तासांमध्ये देशात 53 हजार 476 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. तसेच 26 हजार 490 जण करोनामुक्त झाले. देशात मागील 24 तासांमध्ये करोनामुळे 251 जणांचा मृत्यू झाला.
चिंतेची बाब म्हणजे देशात मागील 24 तासांत आढळलेल्या करोना रुग्णांपैकी 31 हजार 855 रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. देशात सर्वाधिक करोना ऍक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातील करोना ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 लाख 47 हजार 299 झाली. भारतातील 62 टक्के करोना ऍक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाने वाढत्या रुग्णांबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहे. यानुसार, भारतातील कोविड-१९ साथीची दुसऱ्या लाटेचा प्रभाव मेअखरपर्यंत राहू शकतो; परंतु, एप्रिलच्या मध्यापर्यंत या लाटेचा जोर वाढू शकतो. अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पंधरा फेब्रुवारी सुरु झालेली कोविड-१९ साथीच्या दुसरी लाट शंभर दिवसापर्यंत राहू शकते, असे भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाने स्पष्ट केले आहे. येत्या दुसऱ्या लाटेत २५ लाखांहून अधिक लोकांना कोविडची बाधा होऊ शकते, असेही संकेत आहेत.
दुसऱ्या लाटेबाबत सध्या विभिन्न शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या लाटेबाबत एसबीआयच्या आर्थिक संशोधन विभागाने अध्ययन केले आहे. यानुसार, करोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पहिल्या लाटेपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एसबीआयने देशातील अनेक राज्यांमध्ये आतापर्यंत संशोषण केल असून कोविड संशोधन अध्ययननुसार, राजस्थान, गुजरात, केरळ, उत्तरांड, हरयाणा यासारख्या राज्यातील ज्येष्ठांच्या लोकसंख्येच्या २० टक्के ६० वर्षे वयाच्या लोकांचे लसीकरण झाले आहे. तथापि, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचे प्रमाण कमी आहे.