नवी दिल्ली – देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. मात्र अजूनही देशात लाखाच्यावर करोना रुग्णांची भर पडत आहे. अशी परिस्थिती असताना उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी एक वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. ”करोना काही आजार नाहीय. करोना जर आजार असता तर जगात त्यावरील उपाय असता. करोेनाचे संकट हे सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे आलेलं अजाब ए इलाही म्हणजेच संकट आहे. अल्लाह समोर रडून माफी मागितल्यास हे संकट संपेल.” असे विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्र हमान बर्क यांनी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. कोरोना हा काही आजार नाही. कोरोना जर आजार असता तर जगात त्यावर काहीतरी उपाय असता. कोरोनाचे संकट हे सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे आलेलं संकट आहे. अल्लाह समोर रडून माफी मागितल्यास हे संकट नष्ट होईल असे शफीकुर्रहमान बर्क म्हणाले आहेत.
यावेळी खासदार शफीकुर्र रहमान यांनी भाजपा सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. भाजप सरकारने शरीयतमध्ये छेडछाड करण्याबरोबरच आपल्या कार्यकाळामध्ये मुलांना पकडून देत त्यांच्यावर बलात्कार करणे, मॉब लिचिंग आणि इतरही अनेक गुन्हे सरकारने केले आहेत. ज्यामुळे करोनासारखे आसमानी संकट व चक्रीवादळांसारखी नैसर्गिक संकटे देशात आले असल्याचे ते म्हणाले आहेत.
आम्ही मुस्लिमांना मशिदींमध्ये आणि मदरशांमध्ये नमाज पठणाची परवानगी मागितली होती. मात्र सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही. या चुकींमुळेच आज अनेक संकट येत आहेत असेही शफीकुर्रहमान म्हणाले आहेत.