मुंबई – देशातील कोरोना संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होताना दिसतंय. गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, ‘कोरोनावर लस हाच १००% खात्रीशीर उपाय आहे. मात्र कोरोना लस जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला कोरोनासोबत जगणं शिकायला हवं.’ असं वक्तव्य केलं आहे.
यावेळी बोलताना गडकरी यांनी, ‘मुंबई, पुणे, दिल्ली या शहरांमध्ये कोरोनाचे संकट अधिक गडद असल्याने येथील नागरिकांना कोरोना सोबत जगण्याची कला विकसित करण्याची प्रकर्षाने गरज आहे.’ असं मत देखील व्यक्त केलं.
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सरकारतर्फे विविध मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून या सूचनांचे काटेकोर पालन केल्यास कोरोना विषाणूचा प्रसारास अटकाव करणे शक्य आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळायचा असल्यास वारंवार हात साबणाने धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, बाहेर पडताना मास्कचा वापर करणे या सध्या-सोप्या गोष्टी दैनंदिन आयुष्यात पाळल्यास कोरोनाला अटकाव करणे शक्य आहे.
Lot of research going on.If vaccine will be available it’ll be 100% correct solution for the crisis. Presently it’s not available so we need to understand art of living with COVID,particularly in Mumbai,Pune,Delhi-cities where we’re facing crucial problem: Union Min Nitin Gadkari pic.twitter.com/gCNbjIDL3J
— ANI (@ANI) June 22, 2020