जयपूर – करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राजस्थान सरकारने संपूर्ण राज्यात कलम 144 ची घोषणा केली आहे. 22 एप्रिल पासून 21 मे पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. करोनाची सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्य गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, संपूर्ण देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. आजच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात तब्बल 2 लाख 56 हजारहून अधिक करोनाबाधितांचे निदान झाले आहे. तर 1757 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र, दिल्ली, झारखंड यांसह अनेक राज्यांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.