मुंबई – राज्यात आज 12 हजार 557 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 14 हजार 433 करोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 55,43,267 इतकी झाली आहे तर रिकव्हरी रेट 95.05 टक्के झाला आहे.
आज 233 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 1,85,527 सक्रीय रुग्ण आहेत. सध्या राज्यात 13,46,389 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,426 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज फक्त सातारा आणि कोल्हापूरमध्ये हजाराच्या घरात रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. यात साताऱ्यात 1 हजार 148 आणि कोल्हापूरमध्ये 1 हजार 152 रुग्णांची नोंद झाली आहे.