मुंबई – राज्यातील सातारा, अहमदनगर, सोलापूरसह 15 जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने त्या जिल्ह्यात गृहविलगी करण बंद करण्याचे आदेश राज्याचे मसहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज दिले. गृहविलगकिरणात असणार संसर्गित बंधने पाळत नाहीत. ते बाहेर पडतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पुणे-मुंबईसह महानगरांमधील करोना प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र आहे. मात्र त्याचवेळी राज्यातील 15 जिल्ह्यात करोनाबादीतांची संक्या अद्यापही नियंत्रणअत येत नाही. याठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली.
या 15 जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी गृहविलगीकरण बंद करुन त्यांच्यावर कोविड सेंटरमध्ये उपचार केले जावेत, अशी सूचना थोरात यांनी दिली आहे. फक्त अपवादात्मक स्थितीतच होम आयसोलेशनला परवानगी दिली जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
गृहविलगी करणात असणाऱ्या प्रत्येक रुग्णावर करडी नजर ठेवणे प्रशासनाला अशक्य आहे. त्यामुळे या जिल्ह्यात आता होम आयसोलेशन बंद करुन रुग्णाला गावातील वा गावा जवळच्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
हे 15 जिल्हे
सातारा, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, बुलढाणा, रत्नागिरी, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, अकोला, वाशीम, बीड, गडचिरोली आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये हा आदेश लागू असेल, असे सूत्रांनी सांगितले