औरंगाबाद – नांदेड जिल्हतील एकूण 1604 गावांपैकी 1179 गावे करोनामुक्त झाली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. यातील 271 गावांत दुसऱ्या लाटेत करोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यंत करोनाच्या 90 हजार केसेस आढळून आल्या आहेत. करोनामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत 1800 लोक मरण पावले आहेत. या लाटेत ज्या भागात करोना पसरला होता, त्या गावांमध्ये करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे 1179 गावे पूर्ण करोनामुक्त झाली.
नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर म्हणाल्या की, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या टीमवर्कमुळे हे यश शक्य झाले आहे.
या गावांतील तसेच पंचायत समित्या, जिल्हा परिषद यंत्रणांनी समन्वयाने काम केल्याने हा बदल घडू शकलेला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.