नवी दिल्ली : तेलंगणामध्ये करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यााठी राज्य सरकारनं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता तेलंगणात 30 मेपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. आधी तेलंगणा सरकारने 22 मेपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता. यामध्ये दररोज सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत नागरिकांना अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी सूट देण्यात आली होती.
तेलंगणातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी, मंत्रिमंडळ बैठकीत लॉकडाऊन लावण्यावर निर्णय झाल्यावर त्याची घोषणा करण्यात करण्यात आली.याव्यतिरिक्त कृषी आणि यासंबंधित क्षेत्रांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांशी निगडीत क्षेत्रांनाही लॉकडाऊनमधून वगळण्यात आले होते.
औषध कंपन्या, वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, औषध वितरक आणि औषधांची दुकानं, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या चिकित्सकीय आणि आरोग्य सेवांशी निगडीत व्यक्तींना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. सरकारी आणि खाजगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना विशेष पास देण्यात येतील.
तेलंगणातील मंत्रिमंडळाने करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर दैनंदिन आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांसोबत सर्व जिल्हा अध्यक्षांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
तेलंगणा सरकारनं यापूर्वी 11 मे रोजी दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर 12 मेपासून राज्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. या निर्बंधांमध्येही नागरिकांना सकाळी चार तासांसाठी अत्यावश्यक सेवांच्या खरेदीसाठी सूट देण्यात आली होती.