पुणे – चीनसह जगभरात हैदोस घालणाऱ्या करोना विषाणूने आता भारतात आपले पाय रोवले असून, भारतात सुद्धा या साथीच्या रोगाचे अनेक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाला करोनाची धडकी भरली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाला खबरदारी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेचअनेक देशांमध्ये राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्यात आली आहे.
या रोगापासून आपला बचाव करण्यासाठी डॉक्टरांनी मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. याच पार्शवभूमीवर आज आपण हा मास्क का वापरायचा? आणि याचे खरे कारण काय? या विषयी जाणून घेऊया…
करोना विषाणू बाधित व्यक्तींच्या खोकल्याच्या तुषारातून पसरतो. हे तुषार आपल्या श्वासाबरोबर शरीरात गेले, की या आजाराची लागण होते. आपण मास्क लावला, की हे तुषार मास्कमधून श्वासात शिरत नाहीत. त्यामुळे हा मास्क वापरणे गरजेचे आहे.
करोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांनीआवश्यक हा मास्क वापरावा. सर्दी, खोकला अशी करोना विषाणूंच्या बाधेसदृश लक्षणे आहेत अशा व्यक्तींनी सुद्धा मास्कचा वापर करावा.
दरम्यान, मास्कचा वापर करताना तोंड आणि नाक पूर्ण झाकले गेले पाहिजे, चेहऱ्यावर तो सैल न बांधता, घट्ट बसवला पाहिजे. कित्येकदा मास्क घातल्यावर श्वास घ्यायला त्रास होतो, म्हणून नाक उघडे ठेवले जाते, बोलायला त्रास होतो म्हणून मास्क सैल बांधला जातो. मात्र, हे पूर्ण पणे चुकीचे असते.
तुमचा मास्क एकदा वापरून झाल्यावर तो मास्क एका वेगळ्या कागदी पिशवीत भरावा. आणि ती पिशवी सील बंद करून सुक्या कचऱ्याच्या साडब्यात टाकावी. मास्क काढल्यावर हात साबण पाण्याने त्वरीत आणि शास्त्रीय पद्धतीने म्हणजे 20 सेकंद धुवावेत.