औरंगाबाद : कोरोना विषाणूमुळे जगभरात थैमान घातले असून या विषाणूमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. मागील २४ तासात पुण्यात कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असून, मराठवाड्यातही कोरोनाचा पहिला बळी गेला आहे.
तर, औरंगाबादच्या घाटी रुगालयात एका 55 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णावर शहरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते.दरम्यान औरंगाबादेत कोरोना विषाणूचे ८ पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शासकीय रुगालयात उपचार सुरु आहेत.