मुंबई – मास्क न घालणारा एक माणूस तब्बल चारशे लोकांना संक्रमित करू शकतो अशी माहिती टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी दिली आहे. मध्यंतरी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लोकांच्या मनातली कोरोनाची भीती दूर झाली आहे. त्यामुळे बरेच जण मास्क घालायला टाळाटाळ करत आहेत.
पण मास्क न घालण्याचा बेफिकीरीपणा एका-दुसऱ्याच्या नाही तर तब्बल चारशे जणांच्या जिवावर बेतू शकतो.
डॉ. संजय ओक यांनी असेही म्हटले आहे की, विनामास्क फिरणाऱ्या लोकांना त्यांच्या बाजूने जाणाऱ्या लोकांनी रोखले पाहिजे, आणि त्यांना मास्क लावण्याची विनंती केली पाहिजे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी डॉक्टर, आरोग्य यंत्रणा झटते आहे, पण सगळे काही डॉक्टर करतील आणि आम्ही बेजबाबदारपणे वागू, असा विचार केला तर हा आजार आपल्यातून कधीच जाणार नाही, असेही डॉ. संजय ओक यांनी म्हटले आहे.