नवी दिल्ली – देशाच्या विविध भागांना द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू पोहोचविण्याचे भारतीय रेल्वेचे कार्य अविरत चालू आहे. आतापर्यंत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीला 6 ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी 26 टॅंकर्सच्या माध्यमातून 450 मेट्रिक टन प्राणवायू पोहोचविण्यात आला आहे. यासाठी रिकाम्या आणि भरलेल्या गाड्यांनी 10,000 किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास केला आहे.
आता आणखी एक ऑक्सिजन एक्स्प्रेस गाडी बोकारोहून जबलपूरमार्गे भोपाळकडे प्रवास करत आहे. या गाडीत सहा टॅंकर्समधून 90 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू वाहून नेला जात आहे. यामुळे भोपाळ आणि जबलपूर शहरांमार्फत मध्य प्रदेशची प्राणवायूची गरज भागविली जाणार आहे.
आतापर्यंतच्या अंदाजानुसार भारतीय रेल्वेने उत्तर प्रदेशला 202 मेट्रिक टन, महाराष्ट्राला 174 मेट्रिक टन आणि दिल्लीला 70 मेट्रिक टन प्राणवायू पोहोचवला आहे. येत्या चोवीस तासांत 64 मेट्रिक टन प्राणवायू मध्य प्रदेशपर्यंत पोहोचेल.