जयपूर – राजस्थानातील सिकार जिल्ह्यातील एका खेडेगावात कोविडमुळे मरण पावलेल्या एका रुग्णाच्या अंत्यविधीच्या वेळेला कोविडविषयक नियमांचे पालन न केल्याने त्या गावातील 21 जण कोविडमुळे दगावल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. तथापि, सरकारी अधिकाऱ्यांनी मात्र 15 एप्रिल ते 5 मे या अवधीत त्या गावात केवळ चार जणच दगावले असल्याचे म्हटले आहे.
खिरवा असे या गावाचे नाव आहे. तेथे कोविडमुळे मरण पावलेल्या एका रुग्णाचा मृतदहे प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आणण्यात आला. त्याच्या अंत्यविधीला दीडशे लोक उपस्थित होते. प्रत्यक्ष या मृतदेहाचे दफन करण्यापूर्वी उपस्थितांनी या मृतदेहाला हात लावून त्याचे अंत्यदर्शन घेतले. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात करोना फैलावला, असे काही जणांचे म्हणणे आहे.
तथापि, सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, या गावातील जे 21 रुग्ण या काळात मरण पावले त्यातील केवळ चार जणच करोनामुळे मरण पावले आहेत. प्रांत अधिकाऱ्यांनी सांगितले की, या गावात मरण पावलेल्या 21 जणांच्या कुटुंबीयांच्या 147 जणांचे आम्ही टेसिंटग केले आहे.