देवास – देशात करोनाने थैमान घातलं आहे. दररोज लाखो रुग्ण आढळत असून आता मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वैद्यकीय सुविधेअभावी अनेकांना रुग्णालयाच्या बाहेरच प्राण सोडावा लागत आहे. देशात महाराष्ट्रासह आता उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगडमधील आरोग्य यंत्रणांना हतबल झाली आहे. मध्य प्रदेशातील एका कुटुंबात 18 दिवसांत 4 जणांचा मृत्यू झाला.
करोनाने देवास जिल्ह्यात एका कुटुंबाला उध्वस्त केलं आहे. केवळ 18 दिवसांत एका कुटुंबातील 4 जण ठार झाले. या ढक्क्याने घरातील सुनेने देखील आत्महत्या केली आहे. कुटुंबात आता एक वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलं राहिले. देवास येथील बालकिशन गर्ग यांच्या कुटुंबावर करोनाने दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
बालकिशन गर्ग यांच्या पत्नी चंद्रकला यांच करोनाने सर्वात आधी निधन झालं. त्यानंतर मोठा मुलगा संजय याचा १९ एप्रिलला मृत्यू झाला. तर २० एप्रिलला लहान मुलगा स्वप्नेशने अखेरचा श्वास घेतला. या तिघांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने २१ एप्रिलला सुनेने आत्महत्या केल्याचं समजतं. आता बालकिशन गर्ग यांच्यासह घरात लहान मुलं आहेत.