नवी दिल्ली – देशभरात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आतापर्यंत १४ हजार जणांना याची बाधा झाली आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष सल्ला दिला आहे.
राहुल गांधी म्हणाले कि, कोविड -१९ सारखी जागतिक साथीचे रोग हे एक मोठे आव्हान आहे, परंतु ही एक संधी देखील आहे. संकटाच्या वेळी आवश्यक असलेल्या नाविन्यपूर्ण उपायांवर काम करण्यासाठी वैज्ञानिक, अभियंता आणि डेटा तज्ञांचा मोठा समूह एकत्रित करण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, लॉकडाऊन हा कोरोना विषाणूवरचा उपाय नाही. कोरोना विषाणूला हरवण्यासाठी प्रभावी चाचण्या करणे आवश्यक असल्याचे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले होते. त्यांनी गुरुवारी पत्रकारांसोबत संवाद साधला. सरकारने देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.