नवी दिल्ली- पुढच्या वर्षाच्या म्हणजे 2021 च्या जुलै महिन्यापर्यंत 20 ते 25 कोटी भारतीयांना करोनाची लस दिली गेली असेल असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला आहे. पुढच्या वर्षाच्या सुरूवातीलाच आपल्याला लसीचे एकापेक्षा जास्त स्त्रोत उपलब्ध असतील असेही त्यांनी म्हटले आहे.
ैहर्षवर्धन म्हणाले की जुलै महिन्यापर्यंत 20 ते 25 कोटी लोकांसाठी 40 ते 45 कोटी डोस उपलब्ध असतील. तसेच संपूर्ण देशात लसीचे सुनियोतिपणे वितरण व्हावे याची रणनीती आम्ही तयार करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या पाच आठवड्यांत देशातील करोनाच्या स्थितीतही सुधारणा झाली आहे. रोज नव्याने रूग्ण सापडण्याची संख्या गेल्या काही दिवसांत लाखाच्या घरात गेली होती. ते प्रमाण आता बऱ्यापैकी घटले आहे. तसेच पूर्वी करोनाचे रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा 3 दिवस होता. आतो तो 74.9 दिवसांवर गेला आहे. भारतीयांसाठी ही बाब अत्यंत दिलासादायक आहे. तसेच लस जर पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस आली तर वर्षाच्या अखेरपर्यंत पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.