नवी दिल्ली – करोना लशींच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण होताना दिसत आहे. बिगरभाजप राज्यांकडून सातत्याने केंद्रीय आरोग्य खात्याला लक्ष्य केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर मनसुख मांडविय यांनी आरोग्य खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर केंद्राच्या धोरणांवर टीका करणाऱ्या राज्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अपुऱ्या लसीकरणासाठी राज्येच कशी जबाबदार आहेत, हे आरोग्यमंत्र्यांकडून सांगितले जात आहे.
अशातच गुरुवारी केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून आतापर्यंत राज्यांना वितरीत करण्यात आलेल्या लशींची आकडेवारी देण्यात आली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने आतापर्यंत केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना 43,79,78,900 लसी वितरीत केल्या आहेत.
यापैकी 40,59,77,410 लसींचा वापर झाला आहे. यामध्ये वाया गेलेल्या लसींचाही समावेश आहे. मात्र, त्याची स्वतंत्र आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नमूद केलेली नाही.