मुंबई – देशभरात बहुप्रतीक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा आज शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित केले.
देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी कोविड योद्ध्यांना लस देण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना करोनाची लस देण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना दुसऱ्या टप्प्यात लस दिली जाईल.
मात्र अद्यापही करोना लसींबाबत सामान्यांच्या मनात अनेक शंका कुशंका कायम आहेत. यामुळेच सरकारतर्फे लसीबाबत सामान्य जनतेच्या मनात घोंघावत असलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
सरकारने दिलेली माहिती पुढीलप्रमाणे
-
लशीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर नाहीत.
-
लसीकरणं झाल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंगदुखीचा त्रास होऊ शकतो
-
ताप, डोकेदुखी किंवा अंगदुखीचा त्रास 10 टक्के लोकांना होण्याची शक्यता आहे. ही सामान्य गोष्ट आहे.
-
लस घेतल्यानंतर अर्धा तास लसीकरण केंद्रातच थांबावे लागेल. सरकारच्या नियमावलीनुसार हे आवश्यक आहे.
-
कर्करोग, मधुमेह, रक्तदाबासाठी औषधे घेणारेही करोना लस घेऊ शकतात