तिरुवनंतपुरम – केरळमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने रात्रीची संचारबंदी लाग करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग चौथ्या दिवशी केरळमध्ये 30 हजारापेक्षा अधिक करोना रुग्ण सापडले आहेत. या रात्रीच्या संचारबंदीला सोमवारपासून सुरूवात होणार आहे, असे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी जाहीर केले आहे. रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्.ंत ही संचारबंदी लागू असणार आहे.
केरळमध्ये आज 1,67,497 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 31,265 जणांना करोनाचा संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर राज्यभरात 153 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे केरळमधील करोना रुग्णांची एकण संख्या 39,77,572 इतकी झाली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटीचा दर कालच्या 19.22 टक्क्यांवरुन 18.67 टक्के इकतका खाली आला आहे.
राज्यातील परिस्थितीचा आणि विषाणूचा आलेख नियंत्रित राखण्यासाठी उचललेल्या पावलांचा केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी गुरुवारी उच्च अधिकाऱ्यांसह आढावा घेतला. देशातील 1 लाखापेक्षा अधिक स्रिय रुग्ण असलेले केरळ हे एकमेव राज्य आहे. तर 10 हजारापासून 1 लाखापय.र्यंत सक्रिय रुगअण असेलेली 4 राज्ये आहेत. उर्वरित 31 रोज्यांमध्ये 10 हजारांपेक्षा कमी सक्रिय रुग्णसंख्या आहे.