औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाही आता नियंत्रणात आला आहे. आज सोमवारी जिल्ह्यात कोविडचे एकूण 326 रूग्ण आढळून आले आहेत. ही 24 एप्रिल पासूनची नीचांकी संख्या आहे. 24 एप्रिलला तेथे 1497 रूग्ण आढळून आले होते.
आता हे प्रमाण बरेच नियंत्रणात आले आहे. जिल्ह्यात सध्या सक्रिय बाधितांची संख्या 5284 इतकी असल्याचे सांगण्यात येते. 24 एप्रिल ते 24 मे या अवधीत जिल्ह्यात एकूण 23 हजार 249 करोना बाधित झाले होते. जिल्ह्यात कोविडचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने जिल्हा प्रशासन हबकले होते. या जिल्ह्यात करोनामुळे आत्तापर्यंत एकूण 3 हजार 92 रूग्ण दगावले असून एकूण करोना रूग्णांचा आकडा 1 लाख 40 हजार 737 इतका झाला आहे.