चंद्रपूर- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 230 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 9 हजार 812 वर गेली आहे. आतापर्यंत 5 हजार 690 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 974 बाधितांवर उपचार सुरू आहे.
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात लाखांदूर , चंद्रपूर, राजूरा, ब्रम्हपूरी या तालुक्यातील बाधितांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 148 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 139, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन,यवतमाळ तीन आणि भंडारा एक बाधितांचा समावेश आहे.
चंद्रपूर शहर व परिसरातील बालाजी वार्ड, समाधी वार्ड, रेल्वे कॉलनी परिसर, स्नेह नगर, सुमित्रा नगर, अंचलेश्वर वार्ड, महेश नगर, हॉस्पिटल वार्ड, जल नगर, घुटकाळा वार्ड, रयतवारी कॉलनी परिसर, गोपाल नगर, बाबुपेठ, तुकूम, ऊर्जानगर, दुर्गापुर ,पठाणपुरा वार्ड, सिव्हिल लाईन परिसर, भिवापुर वॉर्ड, विठ्ठल मंदिर वार्ड, जटपुरा गेट परिसर, सिद्धार्थ नगर, संजय नगर, गंज वार्ड, ओमकार नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. तर काही तालुक्यात सुद्धा बाधित आढळून आले आहे.