नवी दिल्ली : देशात करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी बाधितांच्या संख्येचा आलेख रोज चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे देशावर करोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट कायम आहे. या सर्वात देशात गेल्या २४ तासांत ४५ हजार ८३ करोनाबाधित आढळले असून ४६० जणांचा मृत्यू झाला आहे. ३५ हजार ८४० रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाकडून याविषयी माहिती देण्यात आली आहे.
नवीन रुग्णांसह देशातील आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ३ कोटी २६ लाख ९५ हजार ३० झाली आहेत. तर मृतांची एकूण संख्या ४ लाख ३७ हजार ८३० वर पोहोचली आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९७.५३ टक्क्यांवर आहे.
COVID19 | India reports 45,083 new cases, 460 deaths and 35,840 recoveries in the last 24 hours; active caseload 3,68,558
Recovery Rate currently at 97.53% pic.twitter.com/4rPH44bS1f
— ANI (@ANI) August 29, 2021
देशात सध्या ३ लाख ६८ हजार ५५८ सक्रिय रुग्ण उपचाराधिन आहेत. तर आतापर्यंत ३ कोटी १८ लाख ८८ हजार ६४२ जण करोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. दरम्यान, देशाचा विकली पॉझिटीव्हीटी रेट २.२८ टक्क्यांवर आहे. गेल्या ६५ दिवसांपासून हा दर तीन टक्क्यांपेक्षा खाली आहे. तर डेली पॉझिटीव्हीटी रेट देखील गेल्या ३४ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी २.५७ टक्क्यांवर आहे.
शनिवारी दिवसभरात सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी ३१ हजार २६५ करोनाबाधित एकट्या केरळ राज्यातील आहेत. तसेच १५३ राज्यात १५३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून ३० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. लसीकरण मोहिमेंतर्गत गेल्या २४ तासांत ७३.८ लाख लोकांचे लसीकरण करण्यात आलं. तर आतापर्यंत एकूण ६३.०९ कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण झाले आहे.