नवी दिल्ली – कोरोनाग्रस्तांच्या संख्येत गेल्या २४ तासांमध्ये १,७५२ रुग्णांची वाढ झाली असून यामुळे भारतातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा २३,४५२ वर जाऊन पोहोचला आहे. याबाबतची अधिकृत आकडेवारी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या दैनंदिन वार्तालापाद्वारे देण्यात आली.
कोरोनाने गेल्या २४ तासांमध्ये ३७ जणांचा बळी घेतला असून या आजाराने आतापर्यंत ७२४ भारतीयांचे प्राण घेतले आहेत. याखेरीज कोरोनाला हरवण्यामध्ये आतापर्यंत ४,८१३ भारतीय यशस्वी झालेत. देशामध्ये सध्याच्या घडीला कोरोनाचे १७,९१५ रुग्ण उपचार घेत आहेत.
1752 new #COVID19 cases & 37 deaths reported in the last 24 hours. Total number of cases rises to 23,452, including 17915 active cases, 4813 cured & 724 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/nX6m1yRjY9
— ANI (@ANI) April 24, 2020