कोपरगाव -तालुक्यात करोनाबाधितांची संख्या दोन शतकी झाली. चार दिवसात दोघांचा मृत्यू झाल्याने करोनामुळे आत्तापर्यंतचा हा तिसरा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे.
बुधवारी (दि.5) वैद्यकीय तपासणीमध्ये तब्बल 30 व्यक्ती करोनाबाधित निष्पन्न झाले तर शहरातील स्वामी समर्थ नगर येथील एक 66 वर्षीय बाधित महिलेचा अहमदनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोपरगावचा करोनाने हा तिसरा बळी गेला आहे.
यापुर्वी लक्ष्मीनगर येथील 55 वर्षाची महिला, संजीवनी येथील 58 वर्षीय पुरुषाचा मृतामध्ये समावेश आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
तालुक्यात या दोन दिवसात 50 करोनाबाधित आढळले असुन आत्तापर्यंत बाधितांची एकुण संख्या 212 झाली असुन 124 व्यक्तींवर उपचार सुरु आहे. तालुक्यात करोनाने तिसरा बळी गेल्याने प्रशासनाकडून नागरिकांनी नियमांचे पालन करण्यचे आवाहन करण्यात आले आहे.