नागपूर – विदर्भातील नागपुरात मारबत अन् बडग्या हा जगातील एकमेव मिरवणुक काढला जातो. हि मिरवणूक तान्ह्या पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस)मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते.
या मारबत्तीच्या प्रकारात काळी व पिवळी आहे.सन 2021 मध्ये काळ्या मारबतीच्या मिरवणुकीला 141 वर्षे तर पिवळ्या मारबतीला 137 वर्षे पूर्ण झाली आहेत. तर येथील स्थानिक या मारबतचा इतिहास सांगतात की,’नागपुरातील बांकाबाई हिने इंग्रजांशी हातमिळवणी केली.बाकांबाईच्या नवर्यानेपण या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही.
म्हणुन, त्याचा निषेध म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरुन केलेल्या पुतळयाची, तसेच तिच्या तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला ‘बडग्या’ची तान्ह्या पोळ्याच्या दिवशी मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते. कोविड काळापूर्वी हि मिरवणूक जल्लोषात साजरी केली जात असे मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या मिरवणुकीला साधेपणाने साजरे केले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून मारबतीकडे ‘कोरोना… घेऊन जाय गे…मारबत’ अशी मागणी नागपूरकर करत आहे.
२०१९ सालातील मारबत मिरवणूक
अशी तयार केली जाते मारबत?
काठ्या आणि बांबूचा वापर करत मोठे पुतळे बनवले जातात, त्यावर फाटके कपडे, चिंध्या गुंडाळतात व विविध रंगांनी रंगवतात. मारबतबरोबर जो बडग्या असतो त्याच्या गळ्यात मोडके झाडू, फाटके कपडे, फुटके डबे, टायरचे तुकडे ह्यांच्या माळा घालतात. बडग्याच्या हातात मुसळ व कमरेला उखळ बांधलेले असते.